Saturday 21 November 2015

गडचिरोलीत उद्योग यावेत याबाबत शासन आग्रही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोहोर्ली ताडोबा चंद्रपूर : गडचिरोलीत उद्योगांनी यावे असे प्रयत्न आपण करीत आहोत. मात्र केवळ कच्चा माल घेण्यापुरते न येता या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार संधी प्राप्त व्हावी यासाठी याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील उभारण्याची अट त्यांना असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

वन विभाग अधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपले शासन कायमच आग्रही राहिलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या लंडन दौऱ्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची त्यांनी भेट घेतली. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

गडचिरोलीत मुबलक असे आयर्न ओर आहे. ज्याच्या प्रक्रियेतून कार उद्योगाला लागणाऱ्या स्टीलची निर्मिती होऊ शकते. महाराष्ट्र सध्या ऑटोमोबाईल हब बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर येथे या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने असे उद्योग सुरु होऊ शकतात. यात ते उद्योग याच भागात सुरु करण्याची अट राहील, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment